कृषि उत्पन्न बाजार समिती,रिसोड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५३ साली मध्यप्रदेश शासन कृषी विभाग दिनांक ११/०३/१९५३ अधिसूचना क्र १४४३-३३१९-१०-५२ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची रिसोड जि.अकोला असे परिशिष्ट क्र १ मध्ये मनुद केल्या प्रमाणे तसेच कापूस बाजार दिनांक ०१/०४/१९५८ रोजीच्या मुंबई शासन राजपत्र भाग मध्ये मे औधोगिक आणि सहकार विभाग मुंबई यांचे प्रसिद्ध केलेल्या दिनांक ०१/०४/१९५८ रोजीच्या अधिसूचन क्र.एम.(एस) २५७२६१५६ एम डब्ल्यू एच मध्ये जाहीर केल्याप्रमाणे आहे.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रात रिसोड तालुक्यापुरते मर्यादित असून कार्यक्षेत्रामध्ये एकूण ९९ गावाचा समावेश आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती कडे स्वतःचे मालकीची मुख्य बाजार आवाराकरीता ६ हेक्टर २८ आर व लोणी उपबाजार आवाराकरिता ०.८१ आर समितीची जमीन आहे. अशी एकूण समितीकडे स्वतःचे मालकीची ७.०९ हेक्टर जमीन उपलब्ध आहे.

रिसोड बाजार समितीने उडीद, मुंग, गहू, सोयाबीन, चना, तुवर, हा.ज्वार, हळद इत्यादी शेतमालाचे नियमन करण्यात आले तसेच गुरांच्या बाजाराचे सुद्धा समितीने नियमन केले असून साप्ताहिक गुरुवार ला बाजार समितीचे आवारात दिनांक ०७/०४/१९९४ पासून गुरांचा बाजार सुरु करण्यात आला आहे. दिनांक १४/०२/२००७ पासून गुरांचा आठवडी बाजार संत अमरदास बाबा संस्थानचे जागेवर भरविला आहे व तो कायम आहे.